आनंदाची माझी शाळा। नाचा खेळा आनंद मेळा ||
गीतफुलोरा आहे संगतीला। कविता गायन करायला चला ||
The first ever
musical program in the field of education, which
includes Marathi, Hindi and selected Sanskrit educational poems. We have
an expertise to teach such poems to students by creating songs out of it which
becomes lifetime learning for them.
We also promote, compose, meaningful,
motivational & well known Poems out of the text books.
विद्यार्थ्यांना कवितेच्या अध्ययनात रुची निर्माण व्हावी यासाठी अशा प्रकारचा अभय-अर्पिता या दांपत्याचा हा उपक्रम कौतुकास्पद आहे. शिक्षकांनी व शक्य झाल्यास पालकांनीही याचा अवश्य लाभ घ्यावा.
कवितांचा रुक्ष वाटणारा भाग आपण सुरांनी हाताळून आकर्षित केला त्याबद्दल अभिनंदन
"कवितेत गाणं असतंच, पण ते कमी लोकांना गवसतं. तुम्हाला ते गवसलयं. भाग्यवान आहात. तुमच्यासारखे झपाटलेले ध्येयवेडे अस्तित्वात आहेत, हे कवी म्हणून आमचं आणि विद्यार्थ्यांचही भाग्य आहे. तुम्ही ज्या पध्दतीने कविता आणि भाषेचं महत्त्व विद्यार्थ्यांपर्यंत पोहचवत आहात, त्यामुळे मराठी भाषेचा प्रचार आणि प्रसार आपोआपच होणार आहे. हा उपक्रम वाढला, तर मराठी भाषा जगविण्यासाठी आंदोलनं करण्याची गरज नाही."
’गीतफ़ुलोरा’मधून विद्यार्थ्याना कवितांची गोडी लागते व त्यातून भावी साहित्यिक निर्माण होतील.
गीतफ़ुलोरामधून विद्यार्थ्यांमध्ये कवितेची आवड तर निर्माण होईलच शिवाय मुलांना कवितेतील मुख्य आशय आणि भावही समजण्यास मदत होईल असे वाटते. शाळाशाळांमधून असे उपक्रम सातत्याने झाले पाहिजेत. शिक्षकांनी आपले अध्यापन अधिक प्रभावी आणि परिणामकारक होण्यासाठी या उपक्रमाचा जरुर लाभ घ्यावा असे मी त्यांना आवाहन करतो.
’गीत फ़ुलोरा’ या कार्यक्रमात पाठ्यपुस्तकातील कविता गाण्यांचे रुप घेऊन नाचतात-बागडतात. कागदावरील कविता विद्यार्थ्यांच्या काळजावर कायमच्या कोरल्या जातात. जे ओठांवर खेळतं, ते पोटात साठायला वेळ लागत नाही. शिक्षण आनंनदायी करण्याचा अभय-अर्पिता यांचा हा उपक्रम शिक्षण क्षेत्रासाठी अत्यंत उपकारक आहे.
विद्यार्थी आणि शिक्षकांना सूर आणि कवितांचे शब्द यांचे नाते समजण्यासाठी ’गीत फ़ुलोरा’ उपयुक्त आहे.
पालिकांच्याच शाळांमध्ये नव्हे तर सर्व शाळांमध्ये गीत फ़ुलोराचे सादरीकरण व्हावे, की जेणे करुन कवितांचा ठेवा मुलांकडून जपला जाईल.
इंडस बालकामगार प्रकल्पाअंतर्गत ’गीतफ़ुलोरा’ सादर झाला. यातून अभ्यासाची गोडी निर्माण होते, हे आम्ही अनुभवले आहे. शिक्षक-विद्यार्थ्यांनी या कार्यक्रमास खूप छान प्रतिसाद दिला.
कविता वाचन, पाठांतर, गायन, सादरीकरण, कवितेचा आशय हे अलिकडे हरवत चाललं आहे. अशा समृध्द कलेच्या अभावानं आपल्या बालकाचं भावविश्व कलात्मक अभिरुची खुरटेल की काय अशी भिती वाटते, म्हणून ’गीतफ़ुलोरा’ बालकांचे व्यक्तिमत्त्व समृध्द करणारा अभिनव संगीतमय उपक्रम आहे, असं मला वाटतं. श्री. अभय आणि अर्पिता कुलकर्णी यांच्या प्रामाणिक तळमळीस हार्दिक शुभेच्छा!
शालेय विद्यार्थ्यांच्या मराठी, हिंदी पाठ्यपुस्तकातील कविता संगीतबद्ध करुन त्यांच्या समोर सादर करण्याची ही संकल्पना मला स्वागतार्ह वाटली. कवितांना तुम्ही दिलेल्या चाली, संगीत व तुमची व अर्पिताची कविता गायनाची पद्धत मुलांना ताल धरायला व डोलायला लावणारी आहे. तुमचा हा गीतफ़ुलोरा कार्यक्रम वरचेवर फ़ुलत राहो, ही सदिच्छा!